महाराष्ट्र सरकारचे कृषी मंत्री, कृषी विभाग मंत्रालय, मुंबई - ४००३२

श्री. धनंजय मुंडे

अध्यक्ष, MAIDC आणि महाराष्ट्र सरकारचे कृषी मंत्री, भारत

महाराष्ट्र हे भारताचे प्रगतीशील व अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचे अत्यंत महत्वाचे महामंडळ आहे. मला सांगण्यास हर्ष होतो की, ही कंपनी, जी भारतीय कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत अंतर्भूत करण्यात आली, ती शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया, विपणन, परोत्पादीत खरेदीविक्री, फार चांगल्या प्रकारे करत आहे. मी आनंदाने सांगू शकतो की हे महामंडळ या महामंडळाच्या कर्मचा−यांव्दारे कार्यकुशलतेने चालविण्यात येत आहे, जे सतत वाढणा−या उलाढालीत व महाराष्ट्र शासनास खात्रीने मिळणा−या लाभांशातून दिसून येते. हे अगदी पहिल्या वर्षापासून म्हणजे डिसेम्बर १९६५ पासून घडत आहे.

हा व्यावसायिक उद्यम असला तरी सामाजीक पैलू विचारात घेऊनच शेतक−यांना उत्पादन आणि विपणन सेवा देण्यात येतात. म्हणूनच केवळ नफा मिळवणे हा उद्देश नसून सामाजीक लाभ देणे, बाजाराचा समतोलपणा राखणे, सतत उच्च गुणवत्ता सांभाळणे, इत्यादी गोष्टी यात सामावल्या आहेत.

केन्द्र व राज्य या दोन्ही शासनाचे कार्यक्रम राबविण्यासाठी ही कंपनी सुविधा पुरविणारी म्हणून काम करते. केन्द्र शासनाचे खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांनी या कंपनीची कृषी उत्पादन प्रक्रियेचा विकास करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करणे, व स्वयं रोजगारातून खेड्यापाड्यात रोजगार संधी उपलब्ध करून देणे, हे या कंपनीच्या अष्टपैलुत्वाबद्दल व कार्यक्रम चांगले राबविण्याबद्दल बरच काही सांगून जाते.

उदारीकरण आणि जागतिकीकरणाला तोंड देण्यासाठी उत्पादन तंत्रज्ञान व विपणन धोरण आर्थीक यशासाठी वृद्धिंगत करणे महत्वाचे आहे. हे महामंडळ बाजार सलग्न व आर्थीक वृद्धीसाठी आवश्यक व महत्वपूर्ण बदल करण्यास वचनबद्ध आहे. उत्पादन सुविधा, पुरक उत्पादने, गर्भीत कौशल्य उदाहरणार्थ विपणनाचे वितरण जाळे जे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे, यावर वृद्धीकरणाचा भर राहील.

जी परिकल्पना 'कृषी सप्तक' या कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आली त्यानुसार ही कंपनी नवनवीन आव्हाने स्विकारण्यासाठी संयुक्त उद्यम करण्यास उत्सूक आहे, 'कृषी सप्तक' हा महाराष्ट्र शासनाने आरंभीत केलेला नवा मोठा कार्यक्रम आहे जो डॉ. स्वामीनाथन कमिटीने केलेल्या शिफारसींवर अवलंबून आहे. महामंडळ, कृषी यांत्रिकीकरण, विशेषतः स्त्रियां जी हस्त साधने व औजारे शेतीसाठी वापरतात, या महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतील. शेवटी मी आशा करतो की, ही कंपनी, राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या शेतक−यांच्या सेवेत अशीच उत्तरोत्तर प्रगती करो! अध्यक्ष, म. कृ. उ. वि. म.